मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकारणात शिंदे गट शिवसेना-भाजप सरकार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात मोठं युद्ध सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. सत्ता काबीज केल्यानंतर शिंदे गट आता शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्याच्या तयारीत आहे. याचच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अनुयायांशी संपर्क साधण्यासाठी आणि ठाकरे गटातील अधिक सैनिकांना जिंकण्यासाठी नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात एक तुफानी दौरा करणार आहेत मुख्यमंत्री शिंदेचा हा दौरा ३० आणि ३१ जुलै रोजी, असणार असून यात दौऱ्यात ते महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. पूरग्रस्त भागांचा आढावा घेतल्यानंतर तेथी नागरिकांना आर्थिक मदतही जाहीर करणार आहेत.
दरम्यान, शिंदे गटामधील ज्येष्ठ आमदार म्हणाले, ‘मुख्यमंत्री हे चोवीस तास काम करणारे राजकारणी आहेत. निसर्गाच्या प्रकोपामुळे प्रभावित झालेल्या लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराअभावी सरकार काम करत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी त्यांच्या प्रस्तावित भेटींचा उद्देश आहे. शिवाय, त्यांनी सांगितले की पक्षाची हालचाली वेगाने सुरू आहेत, कारण अनेक शिवसैनिकांना वाटते की शिंदे त्यांच्याशी योग्य वागतील.
ऑनलाइन आणि ऑफलाइन बैठकींच्या मालिकेदरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झालेल्या गडचिरोली परिसराला भेट दिली होती, त्यांनी सरकारला पंचनामे करून बाधित लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. उद्धव ठाकरेंच्या गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात सहभागी व्हावे यासाठी मुख्यमंत्री शिंदे इतर आमदार जोरदारपणे आपली मोहीम चालवत आहेत. कारण पुढील लढाई ही कायदेशीर मार्गाने लढली जाणार आहे, यामुळे शिंदे गट आपल्या बाजून अधिक संख्या मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.