कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या संततधार वृष्टीमुळे काही भागात दरड कोसळल्यामुळे, तर काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे तसेच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे वाहतूक थांबविण्यात आली आहे. तसेच दमदार पावसामुळे बहुतांश रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. शिवाय अनेक बंधारे पाण्याखाली असल्याने ग्रामीण भागातील एसटी वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणची एसटी सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आले आहे.