कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाचगाव आणि आर. के. नगर येथे होत असलेल्या अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांचे शिष्टमंडळ, महापालिका आयुक्त व अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली.

येत्या दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, हा प्रश्न दोन दिवसांमध्ये निकाली काढण्याची, ग्वाही प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली आहे. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. आ. पाटील यांनी देखील पाचगाव आणि आर. के. नगरमधील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत माहिती जाणून घेतली.