नवी मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई हे आपल्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना वाशी कोकण भवन भागात त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

मंगेश देसाई हे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटापासून ते चांगलेच चर्चेत आले होते. गाडीला अपघात झाल्यानंतर गाडीला पुढच्या भागाचे नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका मंगेश देसाई यांना बसला आहे. मंगेश देसाई यांनी मराठी सिने जगतातील अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.