पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळ गडावरील चार दरवज्याजवळ असणाऱ्या नेबापुर आणि मंगळवार पेठेकडे जाण्याच्या मार्गावरील ऐतिहासिक भिंतचा काही भाग कोसळला. तरी प्रशासननाने याकडे लक्ष देण्याची मागमी एतिहासप्रेमींकडून होत आहे.

सलग दोन दिवस पावसाची संततधार कोसळत असल्याने चारदरवज्याचे उर्वरीत अवशेषांपैकी पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर, मंगळवारपेठ गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली भिंत कोसळली. इथे या वर्षी भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता. याठिकाणी बऱ्याच प्रमाणात भिंतीना तडे गेले आहेत. त्यावेळी पुरातत्व विभागाने याची पाहाणी केली होती. परंतु, निधीअभावी दुरुस्ती होवू शकली नाही.

मात्र, दरवर्षी पडणाऱ्या पावसाने पन्हाळ्याच्या तटबंदीचा आणि जिर्ण भिंतींचा दरवर्षी थोडा भाग कोसळत चालला आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.