मुंबई (प्रतिनिधी) : मिनिटा-मिनिटाला बदलणाऱ्या राज्यातील घडामोडीनंतर पुढचे ४८ तास संपर्कात राहा. कोणत्याही दौऱ्यावर किंवा परदेशामध्ये जाऊ नका अशा सक्त सूचना भाजपाने सर्व आमदारांना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईला पोहोचायला लागू शकते. त्यामुळे सर्वांनी संपर्कात राहावे, अशा सूचना भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तत्काळ दिल्लीकडे रवाना गेले होते. तिथे त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता या विशेष सूचना देण्याची माहिती हाती येत आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून ही माहिती देण्यात आली आहे.