मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक पक्षात “कहीं खुशी कहीं गम” पाहायला मिळत आहे. शिवसेना भाजपनंतर आता काँग्रेसनेही उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसकडून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती, मात्र दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. २२  जुलै रोजी या १० आमदारांची मुदत संपत आहे.