कुंभोज (प्रतिनिधी) : विधवा प्रथा बंद आणि ग्रामपंचायत मिळकतीत पती-पत्नीचे नाव घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज कुंभोज ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुणादेवी पाटील होत्या.

सरपंच अरुणादेवी पाटील म्हणाल्या, विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न देशभर, राज्यभर राबवला जात असल्याने याचा आम्हाला अभिमान आहे. ग्रामपंचायत मिळकतीत पती-पत्नीचे लावण्याचा नाव हा ऐतिहासिक निर्णय आहे, याचे आम्ही एकमताने स्वागत करतो.

यावेळी उपसरपंच अनिकेत चौगुले, सदस्य संभाजी मिसाळ, दाविद घाटगे, जयश्री जाधव, शुभांगी माळी, विशाखा माळी, भारती पोद्दार, सदाशिव महापुरे सुदर्शन चौगुले, गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते.