हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एमपीएसी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्यातून सात विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या चा विद्यार्थ्याची अंतिम यादीत निवड झाली आहे.

यामध्ये अपर्णा यादव (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.  ही ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. तर पूजा अवघडे हिची नायब तहसीलदारपदी निवड झाली असून तिने अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ती मूळची राजारामपुरी, कोल्हापूर येथील आहे.

तसेच करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील विश्वजीत गाताडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. करवीर तालुक्यातील हळदी येथील ऐश्वर्या नाईक यांची भूमिअभिलेख उपअधीक्षकपदी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना विनायक भोसले,, डायरेक्टर विराट गिरी, कोल्हापूर ब्रांच प्रमुख अक्षय पाटील, अमोल पाटील, सचिन सिलवत, सूर्यकांत कांबळे, भरत साबळे आदींचे सहकार्य मिळाले.