रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी बसस्थानकातून कोल्हापूर, कागल, इचलकरंजी या मार्गावर एसटी बसच्या जादा फेऱ्या सोडण्यात याव्यात, अन्यथा सोमवारी (दि.१०) बस स्थानकात ‘बोंब मारो आंदोलन’ करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत बसस्थानकातील लिपीक पी. एन. कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हुपरी परिसरातून कोल्हापूर, कागल, इचलकरंजी, रंकाळा याठिकाणी जाणाऱ्या एसटी बसच्या दिवसातून केवळ २ ते ३ फेऱ्या होत आहेत. त्यामुळे बस फुल्ल होऊन जात असल्यामुळे विद्यार्थी, प्रवासी, नोकरदार यांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे एसटी बसच्या जादा फेऱ्या सुरू कराव्यात.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील गाट, युवकचे कार्याध्यक्ष शिवराज देसाई, अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष अमर कलावंत, अघंटित कामगार सेलचे तालुकाध्यक्ष प्रशांत सुतार, शहराध्यक्ष मनोज कोळी, उपाध्यक्ष चेतन पतंगे, नितीन लोहार, सतिश कंगणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.