मुंबई (प्रतिनिधी) :  महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली. हा कार्यकाळ नव्हे फक्त काळ झाला आहे.  हे सरकार म्हणजे दोन वर्षात सत्ता आणि संपत्ती मिळावण्यासाठी तीन पैश्याचा तमाशा आहे. अशी टिका आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर केली.

आशिष शेलार म्हणाले की, आमचे महाविकास आघाडी सरकारशी वैर नाही. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वेदना मांडत आहोत. दोन वर्षे सरकारला झाले पण त्यांचे ध्येय काय ?  असा सवालही त्यांनी केला. हे  सरकार फक्त पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरणारे सरकार असल्याची टिका नाव न घेता शेलार यांनी केली आहे.  तीन पैश्यांचा तमाशा हे प्रसिद्ध नाटक होते, म्हणजे आजचे सरकार  हे दोन वर्षात सत्ता आणि संपत्ती मिळावण्यासाठी तीन पैश्यांचा तमाशा असल्याचे टिकास्त्र महाविकास आघाडी सरकारवर शेलार यांनी सोडलंय.