कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या आठ दिवसांपासून शहर आणि जिल्हयात ठिकठिकाणी परतीचा पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासांत सर्वाधिक आजरा तालुक्यात ३०. २५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या कामाला ब्रेक लागत आहे. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले ५.१३, शिरोळ ४, पन्हाळा ७.४३, शाहूवाडी ४.१७, राधानगरी ६.३३, गगनबावडा ५, करवीर १. ५५, गडहिंग्लज ६. ७१, भुदरगड २.२०, आजरा ३०.२५, चंदगड ४.३३.